सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

नवराञातच परतुरात वीज पाण्याचे वांदे..? 8 दिवसापासून निर्जळी; परतूर पालिकेचा भोंगळ कारभार



                                                                              

परतूर(प्रतिनिधी)
शहरामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून नगरपालिका व वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चालला असून हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचे असलेला नवरात्र दरम्यान गेल्या आठ ते दहा दिवसापासून परतूर शहरामध्ये मोंढाभागातील अनेक काॅलनीत दुरूस्तीच्या नावाखाली पुर्वकल्पना न देता व पर्यायी व्यवस्था न करता पालिकेने ऐन नवराञातच शहराचा पाणीपुरवठा बंद केल्यामुळे नागरिकात व महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.तसेच पालिकेच्या कुपनलिका बंद व नादुरुस्त असल्याने तसेच,टँकरने सुध्दा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक वैतागले आहेत,पालिकेने पाणीपुरवठा संदर्भात पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते पण पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे ते सुध्दा करणे झाले नाही यामुळे शहरातील नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत.अगोदरच कोरोना महामारीची भीतीचा प्रकोप त्यात हिंदू सणांमध्ये घरातील साफसफाई यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नागरिकांना व महिलांना नवराञाचा नऊ दिवसाचा उपवास असुन सुध्दा गल्लोगल्ली भांडे घेऊन पाण्याच्या शोधात फिरावे लागत आहे. महिन्यातून केवळ पाच ते सहा वेळाच अस्वच्छ व गढुळ तसेच दुषित पाणी येणे हे नित्याचेच झाले आहे.याशिवाय नेहमीच मोटार मध्ये बिघाड किंवा कुठे पाईप फुटणे या कारणावरून आठ आठ दिवसापर्यंत नागरिकांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागते .पालिकेचा एकही कर्मचारी व अधिकारी तसेच लोकप्रतिनीधी पाण्याविषयी बोलायला तयार नाही. शहरातील नागरिक व महिला नवराञात मात्र हातामध्ये भांडे घेऊन गल्लीबोळात पाण्याच्या शोधात फिरताना दिसतात. ऐन सणासुदीत विज पाण्याविना नागरिकांचे हाल होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे अगोदरच पालिका प्रशासनावर स्वच्छता, आरोग्य विषयक प्रश्न,रस्ते,भुमिगत गटारामुळे शहरातील रस्त्याची झालेल्या चाळणीमुळे नागरिक प्रचंड वैतागलेले आहेत.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत