सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

धर्माबाद ते मनमाड एक्स्प्रेस शनिवारी सकाळपासून धावणार..


परभणी, दि. 22 (प्रतिनिधी) ः काचिगुडा ते मनमाड या रेल्वेमार्गावर शनिवारपासून (दि.24) धर्माबाद - मनमाड - धर्माबाद ही विशेष एक्स्प्रेस धावणार आहे.
दरम्यान, यापूर्वी याच वेळेत मराठवाडा एक्स्प्रेस धावत होती. त्याच वेळेत विशेष रेल्वे म्हणून ही रेल्वे धावणार आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे विभागाने नांदे़ड ते पनवेल या एक्स्प्रेस पाठोपाठ मराठवाड्यातील रेल्वेप्रवाशांच्या सोयीकरिता धर्माबाद ते मनमाड व मनमाड ते धर्माबाद ही विशेष रेल्वे शनिवारपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही रेल्वे धर्माबादहून सकाळी चार वाजता निघणार आहे. नांदेड स्थानकावर पाच वाजून 28 मिनिटांनी, पूर्णेत सहा वाजून तीन मिनिटांनी, परभणीत सहा वाजून 38 मिनिटे, मानवतरोड सहा वाजून 57 मिनिटे, सेलूत सात वाजून 17 मिनिटे, परतूर सात वाजून 44 मिनिटे, रांजनी सात वाजून 54 मिनिटे, जालना आठ वाजून 28 मिनिटे, बदनापूर आठ वाजून 49 मिनिटे, मुकूंदवाडी 9 वाजून 29 मिनिटे, औरंगाबाद येथे दहा वाजून पाच मिनिटांनी, लासूर येथे दहा वाजून 41 मिनिटे, करंजगाव दहा वाजून 54 मिनिटे, रोटेगाव 11 वाजून 19 मिनिटे, अंकई 12 वाजून 52 मिनिटे व मनमाड रेल्वे स्थानकावर एक वाजून 20 मिनिटांनी पोचेल.
मनमाड येथून दुपारी तीन वाजता परतीच्या प्रवासास निघेल. अंकई येथे दुपारी तीन वाजून 13 मिनिटे, रोटेगाव तीन वाजून 49 मिनिटे, करजगाव चार वाजून नऊ मिनिटे, लासूर चारवाजून 19 मिनिटे, औरंगाबाद येथे पाच वाजून 50 मिनिटांनी, मुकूंदवाडी सहावाजून 11 मिनिटे, बदनापूर सहा वाजून 36 मिनिटे, जालना सहा वाजून 50 मिनिटे, रांजनगाव सात वाजून 14 मिनिटे, परतूर सात वाजून 29 मिनिटे, सेलू सात वाजून 51 मिनिटे, मानवतरोड आठ वाजून चार मिनिटे, परभणी आठ वाजून 43 मिनिटे, पूर्णा येथे नऊ वाजून 33 मिनिटांना, नांदेड येथे दहा वाजून आठ मिनिटे, उमरी 11 वाजून एक मिनिटे व धर्माबाद येथे रात्री 12 वाजून दहा मिनिटांनी ही एक्प्रेस पोचेल.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत