सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

भारतीय क्रांती सेना व नवरात्र महोत्सव समिती यांच्या वतीने महीला बचत गटांना मार्गदर्शन

औरंगाबाद(प्रतीनीधी) भारतीय क्रांती सेनेच्या वतीने व नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाच आयोजन करण्यात आले होते
          यावेळेस जिल्हा अध्यक्षा सौ संगीता  हनवते यांनी महानगरपालिका महिला बचत गट संघटक श्रीमती शारदा त खरात यांचे स्वागत केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष  वनिता  चव्हाण होत्या 
        या प्रसंगि   उपस्थित महीला बचत गटांना शारदाताई खरात यांनी, पंचशीला महिला बचत गट, त्रिशरण महिला बचत गट, अहिल्यादेवी होळकर महिला बचत गट व राजमाता जिजाबाई महिला बचत गट या महिला सदस्यांना बचतीबाबत व शासकीय योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तद्ननंतर  गटातील महिला सदस्यांना  ब्लँकेटचे वाटप केले याप्रसंगी  मंगल उफाडे ,अमृता सावंत, सखुबाई खकाळ, राणी चिंतामणी ,सुरेखा डख,,रेखा चिंतामणी , शारदा काळे ,नीता डख, सुनीता ताई तिघुले,, संगीता ताई जाधव , मंदाताई काटे, चंदाताई धुमाळ, तसेच वार्डातील शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत