सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

रुग्णांना लाखाची मदत करत केला वाढदिवस साजरा *सभापती आकात यांचा स्तुत्य उपक्रम

परतूर : वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून सभापती आकात यांनी किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना एक लाख रुपयांची मदत केली.
            सभापती कपिल आकात यांचा 21 नोव्हेंबर ला वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पूर्व संध्येला सभापती कपिल आकात यांनी वाढदिवसावरील हार, तुरे, शाल श्रीफळ आदी खर्च टाळून याबाबरोबरच लोकांचा वेळही वाया घालणे टाळून गरजू रुग्णांना आर्थिक मदत केली. दोन किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या यशोदा दत्ता सागडे व हनुमान खंडागळे यांना प्रत्येकी 25 हाजाराची मदत दिली . तसेच अपघातात जखमी झालेले असराबाई गवारे व ज्ञानेश्वर पारद यांना प्रत्येकी 25 हाजारची रोख मदत केली. याबरोबरच हार , तुरे, होल्ड्रिंग लावण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबवून माझा वाढदिवस साजरा करावा असे आव्हानही सभापती कपिल आकात यांनी केले. यावेळी उपाअध्यक्ष कुणाल आकात, विजय राखे, महेश आकात, आसाराम लाटे, सरपंच ओंकार काटे सह
रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत