सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

ग्रामिण रुग्णालय परतुर येथे जागतीक एडस दिन साजरा

परतूर (प्रतीनीधी) ग्रामिण रुग्णालय परतुर येथे जागतीक एडस दिन साजरा करण्यात आला 
      १ डिसेंबर जागतीक एडस दिनाचे औचित्य साधुन ग्रामिण रुग्नालय परतुर येथे जागतीक एडस दिन साजरा करण्यात आला सदरील कार्यक्रमात जागतिक एकता सामाजिक जबाबदारी या घोषवाक्यानुसार वैद्यकिय अधिक्षक डॉ .डि आर नवल यांनी माहिती दिली व सर्व नागरिकांना आपली एच आय व्ही ची तपासणी करून घ्यावी व स्वतःचे एच आय व्ही चे स्टेट्स जाणून घ्यावे असे आवाहन केले तसेच गोपनीयतेची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला . सदरील कार्यक्रमास वैद्यकीय अधिक्षक डॉ . डि आर नवल . वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ . पी के अंभुरे . डॉ काळे डॉ सिद्दीकी डॉ घुगे डॉ काकडे डॉ माने मॅडम एस टी एस ए. जी.खरात व ग्रामिण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी उपस्थीत होते सदरिल कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  आय सी टी सी समुपदेशक शिवहरी डोळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष संमेटा लिंक वर्कर स्किमचे नरेश कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत