सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

तब्बल नऊ महीन्याच्या प्रदिर्घ कालावधी नंतर फिरायलेत रसंवतीची चाके

परतूर दि.09 प्रतिनिधी
 तब्बल नऊ महिन्या नंतर फिरला रासावंतीचा चरखा लहान मुलांसह जेष्ठ नागरिक घेत आहे ऊस पिण्याचा आनंद.
  कोरोना च्या पार्श्वभूमीवर  संपूर्ण देशात 22 मार्च पासून लॉक डाऊन झाल्याने  मागील वर्षी रसवंती चालक मोठे अडचणीत आले होते पण या वर्षी नवीन ऊस तयार होताच परिसरात रासावंतीचा चरखा फिरू लागला व जेष्ठ नागरिकांसाहित सर्वच स्तरातील माणसे रस पिण्याचा मोह अनावर झाला. परतूर वाटूर रोड वरील बरीदे रसवंती वर रसाचा आस्वाद घेताना शर्मा क्रिकेट अकॅडमी चे विद्यार्थी सोबत प्रशिक्षक संतोष शर्मा,भाऊसाहेब मुके 
                    आरती मुके(विध्याथी)
मागील वर्षी कोरोना मुळे आम्हाला ऊसाचा रस पिण्यासाठी मिळाला नाही. पण या वर्षी लवकरच रसवंती चालू झाल्याने आम्ही रस पिण्याचा  आनंद घेत आहोत.
शिवाजी मुझमुले-(रसवंती चालक)
गत वर्षी कोरोना मुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. या पार्श्वभूमीवर या वर्षी लवकरच रसवंती गर्घ चालू करण्यात आले नागरिकांचा पण चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत