सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

राज्य शासनाच्या आदेशाची वाट न पाहता प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत,अवकाळी पाऊस व गारपिटीने मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान,राज्यसरकार कुंभकर्णा सारखे झोपेत -आमदार बबनराव लोणीकर यांचा घणाघात



प्रतिनिधी(जालना)
मराठवाड्यात गेल्या चार दिवसात गारपिट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्शवभूमीवर राज्य शासन आदेशाची प्रशासन वाट पाहत आहे कि सरकार पंचनामे करण्याचे आदेश देईल, परंतु राज्य सरकार आपल्या गैरकारभरात गुंतले आहेत बलात्कार, खून, खंडणी अश्या वेगवेगळ्या प्रकरणात राज्यसरकार चे दररोज धिंडवडे निघत आहेत.

अश्या परिस्थिती राज्य सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे शासन मदत करणार नाहीच परंतु प्रशासनाने वेळ न दवडता राज्यसरकार च्या आदेशाची वाट न पाहता तात्काळ मराठवाड्यात झालेल्या शेती च्या नुकसानीचे पंचनामे करावेत व शासन दरबारी अहवाल पाठवावा.

आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पत्रा द्वारे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी मागणी केली आहे.

चार दिवस उलटून देखील अवकाळी पावसाने, गारपिट ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झालेले नाहीत ज्यावेळी राज्य सरकार आदेश देत नसेल त्यावेळी पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी यांना अधिकार असतात त्यांनी सदर नुकसानीचे पंचनामे करून अहवाल राज्य शासनास पाठवावा असे पत्र आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत