सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष संदीपजी बाहेकर यांची कोविड रुग्णाच्या कुटुंबियांना मदत,माजी मंत्री बबनराव लोणीकर व युमो महामंत्री राहुल लोणीकर यांच्या सूचनेवरून राबवला उपक्रम


परतूर येथे कोविड सेंटर मध्ये ऍडमिट रुग्णांच्या नातेवाईकांना मदत व्हावी या उद्देशाने भाजपा चे नगरसेवक तथा माजी उपनगराध्य संदीपजी बाहेकर यांनी माजी मंत्री बबनराव लोणीकर व युमो महामंत्री राहुल लोणीकर यांच्या सूचनेवरून परतूर कोविड सेंटर येथे ऍडमिट असलेल्या रुग्णाच्या कुटुंबियांची जेवणाची व्यवस्था करून, सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी पुढाकार घेतला असून परतूर येथे रोज सकाळ संध्याकाळ कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना डब्बा पुरवण्याचे काम ते करत आहेत.
 या संदर्भात संदीप बाहेकर म्हणाले की या कठीण प्रसंगी हॉटेल बंद असून रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण उपलब्ध होत नाही हा विचार करून माजी मंत्री बबनराव लोणीकर व युमो प्रदेश सरचिटणीस राहुल भैय्या लोणीकर यांच्या सूचनेवरून आपण ही सेवा करीत असल्याचे सांगितले
  पुढे संदीप बाहेकर म्हणाले की, आज कठीण परिस्थिती असून,या काळात आपण खंबीरपणे उभे राहून जनतेला धीर देण्याची गरज असून या साठी आपण हा उपक्रम राबवत असल्याचे ते म्हणाले

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत