सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

महाराष्ट्र सरकारने योग्य बाजू सुप्रीम कोर्टात न मांडल्याने मराठा आरक्षण रद्द झाले-आमदार बबनराव लोणीकर


सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण आज रद्द करण्यात आले देवेंद्रजी फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस व आम्ही सर्व सहकारी यांनी विधानसभा मध्ये आरक्षण संबंधित कायदा केला जो एकमताने मंजूर करण्यात आला.

मराठा आरक्षण साठी, मराठा समाजासाठी जे जे होईल ते प्रामाणिकपणे मराठा आरक्षण न्याय मिळवून देण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व सर्व सहकारी मंत्री मंडळाने  केले

परंतु आताच्या राज्यसरकारने मराठा आरक्षण बाबत योग्य न्यायिक भूमिका न घेतल्याने सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केले, वारंवार वकील अनुपस्थित राहणे, तारखा विनाकारण वाढवून मागणे अश्या अनेक गोष्टी या सरकारने केल्या.

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची योग्य बाजू न मांडल्यानेच मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आजचा दिवस संपूर्ण मराठा समाजासाठी दुर्दैवी आणि काळा दिवस आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत