सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मुजमुले अँग्रो सर्व्हिसेसचे उदघाटन



..............
परतूर /प्रतिनिधी
परतूर शहरातील मुजमुले अँग्रो
 सर्व्हिसेस & सोल्युशन  चे शुक्रवारी ता.21 रोजी  उदघाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे व कृषि अधिकारी सखाराम पोळ याच्या हस्ते करण्यात आले यावेळी.मंडळ आधिकारी आकाश माने,
नगरसेवक जगन्नाथ बागल, सिदार्थ बंड,द.या.काटे,ऍड विशाल बागल,
शबीर ,सतीश चव्हाण,सुधाकर गिरी,राजेश पवार,मुकुंद खरात, रवी बागल,ओंकार माने,दिपक उबाळे,
 योगेश बरीदे,अजय देसाई,सय्यद वाजेद ,मुन्ना चितोडा,आशिष गारकर , प्रमोद जईद,
सह परीसरातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते


चौकोट...
तरुण युवा पिढी ने  नोकरी च्या मागे न लागता व्यवसायात   उतरावे उत्पादन करून वेगळी ओळख निर्माण करावी,
रवींद्र ठाकरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक

चौकोट....
वाढती बेरोजगारी बघता तरुण वर्गाने  जमेल तो व्यवसाय करून घराला हातभार लावावा.चांगलं उत्पादन घ्यावे.
योगेश बरीदे,पत्रकार

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत