सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

नारियलवाले मारहाण प्रकरणातील पोलीस निलंबित करा -- काकडे



मंठा(प्रतीनीधी)
जालना शहरामध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व पोलीस कर्मचाऱ्यांची गुंडगिरी दिनांक 27 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे. शिवराज नारियलवाले या भाजपाच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी लाठ्या-काठ्या तुटेपर्यंत बेदम मारहाण केली होती. या घटनेचा आपण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने निषेधही व्यक्त केला. भविष्यामध्ये पोलिसांची दादागिरी ही सर्वसामान्य लोकावर दिसून येऊ नये. म्हणून या गोष्टीला आवर घालण्यासाठी पोलिसांची वाढलेली गुंडगिरी थांबवण्यासाठी आपण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन देऊन या घटनेतील संबंधित पोलिस अधिकारी कर्मचारी यांना तातडीने निलंबित करून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी आपण केली असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी माहिती दिली आहे. कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो, हि झालेली अमानुष मारहाण व तो बघितलेला व्हिडिओ कोणताही मनुष्य सहन करणार नाही. इतक्या विचित्र पद्धतीने मारहाण करण्याचे आदेश कोणाचे होते? हे सुद्धा तपासणी करणं महत्त्वाच आहे. पोलिसच जर कायदा हातात घेत असतील तर सर्वसामान्य लोकांनी न्याय कुणाकडे मागायचा? असा सवालही मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी उपस्थित केला आहे. या घटनेची पुढील कार्यवाहीसाठी आपण मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने राज्याचे गृहमंत्री, जालना पोलीस अधीक्षक, विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार करून शिवराज नारियलवाले यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही. तो पर्यंत आवाज उठवत राहणार असल्याचेही सिद्धेश्वर काकडे यांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत