सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर शहरात स्वच्छता मोहीम राबवावी - अर्जुन पाडेवार यांची मागणी

परतूर,दि.१(प्रतिनिधी) - शहरात साथरोग पसरू नये यासाठी नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात यावे तसेच नालेसफाई, जंतुनाशक औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी एका निवेदनाद्वारे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
    यासंदर्भात पाडेवार यांनी पालिकेच्या मुख्याधिका-र्यांना दिलेली निवेदनात म्हटले आहे की, शहरात घाणीचे प्रमाण वाढल्याचे दिसते.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरात साथीचे रोग झपाट्याने पसरू शकतात.सध्या शहराच्या अनेक भागात नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहताना दिसते.त्यामुळे दुर्गंधी देखील पसरते.रोगराई पसरू नये म्हणून शहरात जंतुनाशक औषधींची फवारणी करावी.तसेच शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी जेणे करून रोगराईचा प्रसार होणार नाही आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील असे या निवेदनात म्हटले आहे.
------------------------
  शहर परिसरात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण सापडण्याअगोदरच नगरपालिकांनी याची काळजी घेतली तर साथरोग वेळीच आटोक्यात येईल त्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करावी तसेच नगरपालिकेने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यासह जंतुनाशक औषधीची फवारणी करणे आवश्यक आहे. - अर्जुन पाडेवार, सामाजिक कार्यकर्ते, परतूर.
-----------------------------

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत