सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर शहराच्या विकासासाठी ५ कोटी निधी द्या - मोहन अग्रवाल यांची नगरविकास मंञ्याकडे मागणी



परतूर /प्रतिनिधी
शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा परतुर नगरपालिकेचे विरोधी पक्ष गटनेते मोहन अग्रवाल यांनी शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली परतुर शहराच्या विकास कामासाठी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शहराच्या विकासासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर करा, अशी मागणी निवेदनाद्वारे मंत्रालयात जाऊन प्रत्यक्षात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केलीआहे. परतुर शहराचा रखडलेला विकास पाहता शहरातील विविध भागात विकासकामा अभावी नागरिकां  बेहाल होत असून शहरातील  भुयार गटार योजनेमुळे गल्लोगलीत फुटलेले रस्ते स्वच्छतेचा आभाव व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नंतर शिवसेनेचे मोहन अग्रवाल यांनी  नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन  शहर विकास कामासाठी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर व उपजिल्हाप्रमुख पंडितराव भूतेकर यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत