सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शॉट सर्किट मुळे तळणि परीसरात उसाला लागली आग

तळणी (रवी पाटील) मंठा तालुक्यातील तळणी येथील शेतकरी गणेशराव कापकर यांच्या शेतातील ऊसाला शॉर्ट सर्कीट मुळे आग लागून दीड ते दोन एकर मधील ऊसाचे मोठे नुकसान झाले शेतातून गेलेल्या विद्युत पूरवठ्याच्या तारा मध्ये घर्षण होऊन ती ठिणगी ऊसाच्या शेतामध्ये पडली कापकर यांच्या शेताजवळच वंसत नगर वस्ती असुन त्या वस्तीतील पंचवीस ते तीस तरूणानी व शेतातील कामगारानी ही आग आटोक्यात आणली नसता इतर शेतातील ऊसाचे सुध्दा मोठे नुकसान झाले असते संबंधीत शेतकर्याचा ऊस हा तोडणीसाठी तयार आहे उस वाहतूकीसाठी त्यानी रस्त्याची डागडूजी सुधा केली दोन दीवसात ऊसाची तोडणी करण्याच्या तयारी चालू होती या आगीमुळे शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे शेतामध्ये लोबंकळणाऱ्या ताराची मोठी समस्या तळणी परिसरातील अनेक शेतकर्याच्या शेतामध्ये ही समस्या आहे महावीतरण कंपनी ने याकडे लक्ष देऊन त्याना व्यवस्थीत करून देण्याची मागणी अनेक दीवसापासुन अनेक शेतकर्यानी केली तरी याकडे दुर्लक्ष होत असल्याने नुकसानीच्या घटनेला शेतकर्याना सामोरे जावे लागत आहे संबंधीत शेतकर्याच्या नुकसानीचा पंचनामा करून मदत मीळाली पाहीजे अशी मागणी शेतकर्यानी केली आहे 

लोबकळणाऱ्या विद्युत तारावीषयी अनेक वेळा महावीतरण च्या कर्मचार्याकडे तक्रार करून सुध्दा त्याची दखल घेतली गेली नाही संबंधीत नुकसानीला महावीतरण जबाबदार असुन त्याच्या विरुद्ध तक्रार करणार असल्याचे गणेशराव कापकर यानी सांगीतले

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत