सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा महा.विज वितरण कंपनीचा मनमानी कारभार,नागरीक त्रस्त


 मंठा(सुभाष वायाळ)मंठा महा. विज वितरण कंपनी मंठा शहरातील व खेड्यातील त्यांना हवे तेव्हा शहरातील व खेड्यातील वीज पुरवठा खंडित करतात. दिनांक 13 वार सोमवार रोजी दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.ते वीज पुरवठा खंडित करत असताना कुठल्याही प्रकारची नागरिकांना व व्यवसायिकांना पूर्वसूचना देत नाहीत. त्यामुळे विज वर अवलंबून असणाऱ्या  छोट्या व्यवसायिकांच्या व्यवसायावर परिणाम होऊन   त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. व मोठ्या व्यवसायिकांना वीज वर अवलंबून असणारे व्यवसाय त्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. आज जवळपास सर्वच व्यवसाय हे विजेवर अवलंबून आहेत. त्या सर्वांना तोटा सहन करावा लागत आहे. व अत्यावश्यक सेवा मध्ये असणारी सर्व क्षेत्रांना सुद्धा वीज पुरवठा खंडित चा परिणाम होत आहे. घरगुती वीज वापरणाऱ्यानाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यापुढे वीज पुरवठा खंडित करत असताना नागरिकांना पूर्वसूचना देण्यात यावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे पूर्वसूचना न दिल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली. वरिष्ठ अभियंता यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत