सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा पशुवैद्यकीय दवाखान्याची दयनीय अवस्था अधिकारी व कर्मचारी सतत गैरहजर


 मंठा (सुभाष वायाळ)दि. 14 मंठा हे तालुक्याचे ठिकाण असून मंठा या ठिकाणी राज्य शासनाचा पशुवैद्यकीय दवाखाना अस्तित्वात आहे. या दवाखान्या वर शहरातील व बरेच शे खेडेगावातील जनावरे, पशुपक्षी वैद्यकीय उपचारासाठी अवलंबून आहेत. राज्य शासनाने लाखो रुपये खर्चून सुसज्ज अशी इमारत बांधली आहे.परंतु या दवाखान्यामध्ये व आजूबाजूचा परिसरात घाणीचे साम्राज्य आहे व हा परिसर पूर्णपणे अस्वच्छ आहे. यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांचा नाकर्तेपणा स्पष्ट दिसून येतो. शेतकऱ्यांना शेतीतील काम धंदा सोडून जनावरांना या दवाखान्यामध्ये घेऊन यावे लागतात. तसेच जवळपासच्या खेड्यांमधून सुद्धा या दवाखाना मध्ये जनावरे घेऊन येतात. परंतु त्या ठिकाणी कर्मचारी अधिकारी उपस्थित नसतात.या दवाखाना मध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध असल्याचे दिसून येत नाहीत तसेच तेथील अधिकारी व कर्मचारी सतत गैरहजर असतात. शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खाजगी वैद्यकीय उपचार करावा लागतो. व नाहक भुर्दंड भरावा लागतो. वेळीच उपचार न मिळाल्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा परिणाम पशुपालन करणारे यांच्यावर झाल्याचा दिसून येतो. मंठा परिसरामध्ये बरेचसे पशुपालक पशुपक्ष्यांचे व जनावरांचे लसीकरण सुद्धा खाजगी मध्ये करून घेतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर वेळीच लक्ष द्यावे. व शेतकऱ्यांची यातून सुटका करावी. तालुक्यातील शेतकरी व पशु पक्षी पालक राज्य सरकारच्या पशुवैद्यकीय दवाखान्या बद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत