सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

दत्त जयंती निमित्त गिरगावकर महाराजांचे किर्तन


परतूर : (प्रतीनीधी)तालुक्यातील हरेराम नगर येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही दत्त जयंती निमित्त दी१८-१२-२०२१ रोजी वार शनिवारी सकाळी १०:३० वाजता बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी केले आहे. 
रामराव कणसे यांनी १९५८मध्ये हरेराम नगर येथील सुरु केलेल्या दत्त जयंती उत्सवाला अनेक वर्षांची परंपरा असून आता पर्यंत अनेक मान्यवर किर्तनकरांनी या उत्सवात आपली कीर्तन सेवा दिली आहे. हरेराम नगर येथील कणसे कुटुंबीयांकडे या उत्सवाचे यजमान पद आहे. 
दत्त जयंतीला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर कोरोना विषयक नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कणसे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत