सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

अखेर आज डेमु पॅसेंजर ला पारडगाव रेल्वे स्टेशन थांबा मिळाला..


परतूर ( हनुमंत दवंडे)
घनसावंगी तालुक्यातील पारड गाव या ठिकाणी
       मागील 1 महिन्यापासून डेमू पॅसेंजर गाडी चालू झाली होती .परंतु ही  गाडी पारडंगाव येथे थांबत नव्हती .यासाठी ग्रामस्थांकडून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे थांब्यासाठी मागणी करण्यात आली होती..
        आज थांबा मिळाल्यानंतर समस्थ ग्रामस्थांच्या वतीने  पायलट मिनाज सर व गाडीस हार घालून स्वागत करण्यात आले.
               ग्रामस्थांच्या वतीने रेल्वे प्रशासन व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार मानले....
     यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव भालेकर, पत्रकार नजीर कुरेशी , रामेश्वर ढेरे , दिगंबर ढेरे, बाबा सय्यद , प्रसाद सुतार , भारत काळे , पुंजाराम मंडपे , अब्दुल रहीम,  अंबादास वढे , संभाजी ताठे, पवन भारस्कर , ज्ञानराज भालेकर , अक्षय आढाव ,रितेश वैष्णव , माऊली गायकवाड , सत्तर भाई, अब्दुल हक यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत