सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा महा.वीज वितरण कंपनीचा कारभार बेभरोसा- शेतकऱ्यांची विज अभावी पिके करपू लागली



 मंठा (सुभाष वायाळ)दि.27 मंठा तालुक्यातील महा.विज वितरण कंपनीचा कारभार हा परतुर या ठिकाणावरून सध्या चालत आहे. मंठा येथील अधिकृत अधिकारी म्हणून पदावर असणारे मुख्यअभियंता श्री खंडागळे यांची बदली होऊनबरेच दिवस ओलांडले आहेत. तरी आतापर्यंत कुठलेही अधिकारी त्या पदावर रुजू झाले नाही. मंठा तालुक्यातील चार्ज हा परतुर येथील अभियंता श्री बेंडाळे यांच्याकडे आहे. ते मंठा येथे चार्ज घेतल्यानंतर फिरकलेच नाही.मंठा महा. विज वितरण कंपनी मध्ये शेतकरी व नागरिक त्यांच्या कामा करिता गेले तर तेथील अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. व सध्या चार्ज परतुर येथील अधिकाऱ्याकडे आहे. आम्ही काही करू शकत नाहीत. त्यांना येऊ द्या नंतर तुम्ही तुमचे काम सांगा असे सांगून वेळ मारून नेत आहेत. सध्या तालुक्यामधील बऱ्याचशा शेतकरी नागरिकांची नवीन वीज जोडणी, मीटर खराबी,विज बिल वाढ, विज बिल दुरुस्ती, नवीन ट्रांसफार्मर (डीपी)घेणे, ट्रांसफार्मर(डीपी.)दुरुस्ती, शेतकऱ्यांना वीज पुरवठा ही रात्री केला जात आहे.त्यामध्ये ही बऱ्याच वेळा वीज पुरवठा खंडित केला जात आहे.अशी अनेक कामे रखडलेली आहेत. तरी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

 चौकट
 मंठा येथे प्रभारी असलेले परतुर येथील अभियंता श्री बेंडाळे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा खूप वेळा प्रयत्न केला. परंतु त्यांनी त्याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. सामान्य शेतकऱ्यांना तर त्यांचा भ्रमणध्वनी नंबर ही मंठा कार्यालयात कोणी देत नाही.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत