सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

विटा महाग, लाभार्थ्याचे बजेट कोलमडले.


परतूर (हनूमंत दवंडे)
परतूर तालुक्यात घरकुल योजने अंतर्गत अनेक घराचे बांधकाम सुरु आहे.आधीच बांधकामाकरिता वापरात येत असलेल्या विविध साहित्याच्या दरात भरमसाठ वाढ झाली असतानाच आता वीट भट्टी मालकांनी ही विटाचे दर वाढविल्याने ही दरवाढ घरकुल लाभार्थ्याचे बजेट बिघडवणारी ठरत आहे .शासनाच्या पंतप्रधान घरकुल योजना ,शबरी घरकुल योजना ,रमाई घरकुल योजना, समाज कल्याण विभाग घरकुल योजने अंतर्गत परतूर तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना विशिष्ट मर्यादित घरकुल बांधकाम करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहे. मात्र घरकुल बांधकामाकरिता वापरात येणाऱ्या साहित्यात दरवाढ झाली असल्याने लाभार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामध्ये रेती, लोहा, सिमेंट ,मुरूम ,विटा ,आधी साहित्याचा समावेश आहे. विटा ची मागणी वाढ ली याचा फायदा घेत विटा भट्टी मालकाची मनमर्जी चालू  झाली आहे .वीटभट्टी मालक प्रति ट्रॅक्टर नऊ हजार रुपये दर आकारीत असल्याने लाभार्थ्यांना घरकुल कामात अडचणी येत आहेत..

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत