सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांची वाहनधारकांवर कारवाई


 मंठा -- (सुभाष वायाळ)दि. 4 मंठा शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर शहरातील पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी कारवाई केली. यामध्ये वशिष्ठ बळीराम बोराडे राहणार आंबोडा कदम,अशोक भारतराव थोरात  राहणार नांदगाव,शिवाजी बंसी पवार राहणार गारटेकी, विकास भगवान ईघारे राहणार कीर्तापूर, आदिनाथ संभाजी जाधव राहणार तळतोंडी ही सर्व वाहने वाहनधारकांनी बेशिस्तपणे मुख्य रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पोलिसांनी वरील सर्व वाहनधारकांवर कारवाई केली आहे. वरील कारवाई पोलिस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे, प्रशांत काळे,विलास कातकडे, दिपक आढे, सुनील ईगल, दिपक ढवळे, वसंत राठोड यांनी केली. या कारवाईमुळे शहरातील अवैध वाहतूक व बेसिस्त वाहन धारक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत