सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

माता-पित्याची सेवा हीच खरी ईश्वर ,बदलत चाललेली समाजव्यवस्था घातक,हभप बंडातात्या कराडकर महाराज,आई वडिलांच्या शिकवणी मुळेच मी इथपर्यंत पोहचलो*-*माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर


प्रतिनधी(आष्टी)
आई-वडिलांच्या सेवेत सर्व सुख सामावलेले असून,आई वडिलांच्या आज्ञेत राहणारा प्रत्येक मुलगा ईश्वराच्या जवळ आहे असे प्रतिपादन हभप बंडातात्या कराडकर यांनी केले
   ते लोणी खु ता परतूर येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे वडील स्व. दत्तात्रय (नाना) लोणीकर यांच्या चौदाव्याचा कार्यक्रमा प्रसंगी हरिकर्तनात बोलत होते
     
*आपुलिया हिता जो असे जागता। धन्य मातापिता तयाचिया।*
*कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक। तयाचा हरिख वाटे देवा।*
*गीता भागवत करिती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे।*
*तुका म्हणे मज घडो त्याची सेवा। तरी माझ्या दैवा पार नाही॥*
  या अभांगचे निरूपण करताना त्यांनी अनेक दाखले देत मातृ पित्र सेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असून युवा पिढीने हे व्रत अंगिकारने गरजे असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले
    पुढे हभप बंडातात्या कराडकर म्हणाले की, बदलत चाललेली समाजव्यवस्था ही, विघातक असून या व्यवस्थे मुळे आई वडील पती पत्नी  या नात्याना तिलांजली दिली असून या मुळे सांस्कृति विनाशाच्या उंबरठ्यावर आपण असून हे थांबवन्यासाठी सांस्कृति चे जतन करणे गरजेचे असल्याचे ही ते म्हणाले 
=======================
*आई वडिलांच्या शिकवणी मुळेच मी इथपर्यंत पोहचलो*
*माजी मंत्री बबनराव लोणीकर*
=======================
उपस्थितांचे आभार मानताना माजी मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, आई वडिलांनी केलेल्या संस्कारा मुळे आपण राजकारणाच्या माध्यमातून समाजाची सेवा करू शकलो असे सांगतानाच माझे वडील धार्मिक प्रवृत्तीचे होते त्यांनी संपूर्ण आयुष्य पंढरपूर ची वारी न चुकता केली अनेक प्रसिद्ध कीर्तनकाराच्या किर्तना मध्ये आपल्या अभंगाच्या माध्यमातूंन सेवा केली  असे भावूक उदगार या वेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले..!!

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत