सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

खांडवी येथे लोकसहभागातून पांदण रस्त्याच्या कामाचे उद्घाटन,लोकसहभागातून पांदण रस्त्यांचा विकास म्हणजे गावाला समृद्धीकडे नेण्याचा मार्ग-राहूल लोणिकर

परतूर( हनुमंत दवंडे)
  गाव विकासात पांदण रस्ते हे अतिशय महत्त्वाचे असून कर्जमाफी गावाला समृद्धीकडे नेण्याचा तारखेचा उत्तम मार्ग असल्याचे प्रतिपादन युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी केले
  खांडवी तालुका परतुर येथे लोकसहभागातून साकारत असलेल्या पांदण रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते
    पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की पांदण रस्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतीतील उत्पादित माल ने आन करण्यासाठी महत्त्वाचा पर्याय असून खांडवी गावातील ग्रामस्थांनी या कामात पुढाकार घेतल्यामुळे आपण आनंदी असल्याचे यावेळी बोलताना ते म्हणाले
     मतदार संघाच्या विकासामध्ये आमदार लोणीकर साहेबांनी भर घातली खेड्यांना शहराशी डांबरीकरणाच्या मार्गाने जोडले त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सुलभ दळणवळण करण्यासाठी व्यवस्था झाली असल्याचेही यावेळी ते म्हणाले
     खांडवी गावातील ग्रामस्थांनी गाव विकासात पुढाकार घेतल्याचे कौतुक करतानाच ते म्हणाले की प्रत्येक गावाने खांडवी चा आदर्श समोर ठेवून लोकसहभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे असणारी पांदण रस्त्यांची कामे करावीत
या वेळी माजी जि प सदस्य अशोकराव बरकुले,सतिशराव गाडगे, सरपंच गणेश हरकळ, विठ्ठलराव बरकुले, भास्करराव बरकुले, दत्ता बरकुले, भीमा बरकुले, कान्होजी साळवे, मंडळ अधिकारी वरफळकर, तलाठी किरण जोशी, ग्रामविकास अधिकारी बागुल, पोलीस पाटील अंकुश बरकुले, दत्ता जगदाळे, बळीराम बरकुले, सीताराम बिलारे, बाबासाहेब भापकर, गणेश जगदाळे, विलास गाडगे, दत्ता ठोंबरे, यांच्या सह गावकऱ्यांची उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत