सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर शहरातील वाहतूक कोंडी बाबत सम-विषम पार्किंग व्यवस्थावाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे पोलीस निरीक्षक कौठाळे याचे आवाहन



परतूर/शेख अथर 
 शहरात नेहमीच होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी परतूर पोलिसांनी शहरात पी.वन पी टू पार्किंग व्यवस्था येत्या दोन दिवसात सुरू करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी दिली.
शांतता कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.
शहरातील मुख्य रस्त्यांवर यासाठी फलकही लावण्यात येणार असून याबाबत व्यापारी वर्गात व जनसामान्य नागरिकांना माहिती व्हावी म्हणून जनजागृती ही करण्यात येणार असून.
यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात का होईना सुटणार आहे . शहरात ग्रामीण भागातील शेतकरी खरेदी - विक्रीसाठी येतात तसेच शासकीय व खाजगी कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही अधिक आहे .त्यामुळे शहरात वाहनांची नेहमी वर्दळ असते . शहरातील मुख्य रस्त्यावर सर्व शासकीय कार्यालये व बाजारपेठेतील महत्वाचे दुकाने असल्याने मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहने उभी केली जातात.या बेशिस्त वाहनांमुळे मुख्य रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी वाढत जाते . ही समस्या लक्षात घेऊन  पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी  पुढाकार घेऊन शहरातील मुख्य रस्त्यावर पार्किंगसाठीच्या खुणा करून व रस्त्याच्या दोन्ही बाजूस पी वन , पी टू चे फलक लावून स्थानिक व्यावसायिक व नागरिकांना सम - विषम तारखेनुसार वाहने उभे करण्याच्या सूचना दिल्या देण्यात येणार आहे . पी वन , पी टू पार्किंग व्यवस्थेचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात येणार असून नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याने नागरिकांनी सम - विषम तारखेला पी वन , पी टू पध्दतीने आपली वाहने उभी करावी , असे आवाहन करण्यात आले आहे . येणाऱ्या काळात शहरात पार्किंगसाठी स्वतंत्र जागा पाहून नियोजन करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे  यांनी सांगितले
तसेच नागरिकांनी समविषम पार्किंग बाबत सहकार्य करावे जेणेकरून शहरातील वाहतूक कोंडीची समस्यां सोडवण्यात मदत होईल असे आवाहन पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले 
यावेळी सचिन पुंडगे,गोरखनाथ शेळके,नितीन गट्टूवार यांच्यासह सादेख खतीब,द.या.काटे,अर्जुन पाडेवार,एम एल कुरेशी,योगेश बरीदे,श्यामसुंदर चित्तोडा, राहुल मुजमुले, सागर काजळे, संतोष शर्मा, दीपक हिवाळे, सय्यद वाजेद, सर्फराज नायकवाडी,असेफ शेख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लादून दिलेल्या निर्बंधाचे पालन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत