सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

रोहिना बु. येथे गेल्या दोन महिन्यापासून तलाठी गायब ! अबब!


परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
परतूर तालुक्यातील रोहिना बु.  या गावाला गेल्या दोन महिन्यापासून तलाठी नसल्यामुळे शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबली आहेत त्यामध्ये ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व जनता यांमधील दुव्याचे काम करणे. शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत असते. शेतकऱ्यांना तलाठ्याकडून दिला जाणारा सातबारा आहे तो मिळत नाही तलाठी गावात वेळेवर  नसल्यामुळे फेरफार असेल हस्त लिखित 7/12 असेल नवीन रजिस्ट्रीची  कामे जी आहे ती सुद्धा खोळंबलेली  आहेत. तसेच तीन वर्षाचे शैक्षणिक कामासाठी लागणारे उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सुद्धा वेळेवर मिळत नाही कारण की फाईल त्रुटी मध्ये काढले जाते त्याला जोडलेला सातबारा नसतो त्यामुळे . नमुना नंबर 8 अ अद्यावत करणे, वरीलप्रमाणे सर्वच कामे खोळंबली असल्या मुळे शेतकरी हतबल झाला आहे. आणि यामुळे आता प्रशासनाला आम्ही हाक देत आहोत की कोणी रोहिना बु. गावाला तलाठी देता का हो? अशी आरोळी देण्याची वेळ आली आहे. अश्या आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. तरी माझ्या गावाला तात्काळ तलाठी न दिल्यास तहसील कार्यालय  परतूर येथे  नारायण परसराम काळदाते या शेतकऱ्यांनी उपोषना ला बसण्याचा इशारा दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत