सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

सर्व क्षेत्रात श्रेष्ठ क्षेत्र म्हनुन शिक्षण क्षेत्राची ओळख-कपिल आकातपरतूर-विशाखा राखे याची गैरव समारंभ



परतूर /हनुमंत दवंडे 
सर्व क्षेत्रात श्रेष्ठ क्षेत्र म्हणून शिक्षण क्षेत्राची ओळख आहे आणि या क्षेत्रात ज्यांना सेवा करण्याची संधी मिळते ते खूप भाग्यवान असतात असे उदगार मंगळवारी ता. 25 रोजी आयोजित ला बहादूर शास्त्री कन्या विद्यालयाच्या सह शिक्षिका  विशाखा राखे यांच्या निरोप समारंभ प्रसंगी मराठवाडा सर्वोदय शिक्षक प्रसारक मंडळाचे सचिव कपिल आकात यांनी काढले. या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई आकात,उपाध्यक्ष कुणाल आकात,माजी नगराध्यक्ष विनायक काळे ,माजी उपनगर अध्यक्ष विजय राखे आदी उपस्थित होते.
                            
                   या वेळी पुढे बोलताना श्री.आकात म्हणाले शैक्षणिक क्षेत्रातुन च भारत देशाचा सुजाण  नागरिक घडवण्याचे कार्य होते. आणि ही संधी शिक्षक वर्गाला मिळते त्यामुळे शिक्षक हा खूप नशीबवान व्यक्ती असल्याचे ते म्हणाले.
 या वेळी श्रीमती विशाखा राखे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. या वेळी श्रीमती वर्षाताई आकात, नगरसेवक अंकुश तेलगड,अखिल काजी, प्रा. भारत खंदारे, प्रा.अंकुश मोरे,मा. प्रा. भगवान दिरंगे,सय्यद आरेफ अली,खयूम भाई पठाण,जमील कुरेशी, स्व.बाबासाहेब भाऊ आकात पत संस्थेचे व्यवसथपक शिवाजी ढगे, मुख्यध्यापक संजय जाधव, शाम कबाडी,तुकाराम जईद,रामराव घुगे,रमेश निर्वळ,श्रीमती माधुरी देशपांडे,श्रीधर डोंगरे,राहुल मूजमुले,वैभव बागल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल काळे यांनी केले तर आभार श्रीमती वृन्दा डक यांनी केले.
.....................    ......

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत