सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

सामाजिक वनीकरणच्या शेतकऱ्याच्या बांधावर वृक्ष लागवड लाभर्थ्यांची चौकशी करण्याची मागणी


परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे 

तालुक्यात सामाजिक वनीकरण परिक्षेत्रात शेतकऱ्याच्या बांधावर वृक्ष लागवडी प्रस्ताव मंजुर लाभर्थ्यांची चौकशी करण्याची सामाजिक कार्यकर्त्ये पांडुरंग शेजुळ यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कार्यालया, परतुर या अतर्गत सन २०२०-२१ मध्ये वृक्ष लागवड योजने अंतर्गत तालुक्यातील अर्ज मागविण्यात आली होती. प्राप्त प्रस्ताव मंजुर झालेले आहे. मंजुर लार्भाथ्यांना करारपत्र बंदपत्र / शपथपत्र या तिन अटी बंधनकारक ठेवण्यात येऊन त्या मध्ये शंभर रुपयाच्या बॉड पेपरवर शपथपत्र पत्र मागितले आहे. पत्रकामध्ये नियम व अटी प्रमाणे यापूर्वी कोणत्याही शासकीय निमशासकीय खासगी संस्थेत वृक्षलागवडीच्या करिता अनुदान घेतले नाही किंवा योजना चालू असे पर्यंत लाभ  घेणार नाही. असे बंधन असतांना सामाजिक वनीकरण कार्यालयाने यापूर्वी लाभ घेतलेल्या लाभर्थ्यांना प्रस्ताव मंजूर करून परत दुसर्‍यांदा लाभ देण्यात आला आहे. तर जाणीव पूर्वक नियमात बसणार्‍य लाभर्थ्यांना डावलण्यात आले आहे. सामाजिक वनीकरणने बांधावर वृक्ष लागवड योजनेत निवडलेल्या लाभर्थ्यांची चौकशी समिती नेमवून चौकशी करावी. तसेच कृषि विभाग मार्फत महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत लाभ घेतलेल्या लाभर्थ्यांना दुबार लाभ देण्यात येऊ नये. अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्त्ये पांडुरंग तुळशीराम शेजुळ यांची स्वाक्षरी आहे.  

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत