सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

गाडगेबाबांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजीविरुद्ध समाज प्रबोधन केले.-.अॅड महेंद्रकुमार वेडेकर


परतूर प्रतिनिधी  हनुमंत दवंडे
लोकांना सांगण्यापूर्वी स्वतः कृती केली व त्यातून सामाजिक प्रश्नांचा विचार गाडगेबाबांनी पुढे नेला असे प्रतिपादन अॅड महेंद्रकुमार वेडेकर यांनी केले. परतूर तालुक्यातील लिंगसा येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्ताने व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी ते बोलत होते.
           लिंगसा येथील सरपंच व गावकरी यांच्या वतीने गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. पुढे ते म्हणाले गाडगे बाबांनी आपल्या सहज सोप्या सवांदाने समाजाची मने प्रवर्तित केली लोकांच्या मनातील अज्ञान ,अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड, आदी समाजविघातक बाबीवर त्यांनी सडकून टीका केली. मायबाप शिक्षण हीच तुमच्या विकासाची व प्रगतीची गुरुकिल्ली आहे घरातील भांडे कुंडे विकून शिक्षण घ्या असा उपदेश ते करत असत गाडगेबाबा नी नुसते विचार सांगितले नाही तर कृतीशीलताही अंगी मानवली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा गाडगेबाबांच्या सामाजिक कार्याची नोंद घेतली .बाबासाहेब गाडगे बाबांचे किर्तन ऐकायला आवर्जून जात असतं तसेच त्यांच्याबरोबर सल्लामसलत करत असत त्यांना ते गुरु मानत असत असा महापुरुष पूर्वी कधी झाला नाही . यावरून गाडगेबाबा विषयीचे महत्त्व आपल्या लक्षात येते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार प्रदर्शन कैलास पिसाळ यांनी मानले . याप्रसंगी हनुमंत दवंडे (मौर्य क्रांती संघ तालुका अध्यक्ष परतूर) ,इंद्रजित डवले(ग्रा.प. उपसरपंच लिंगसा, ग्रामपंचायत सदस्य बाबाराव डवले, - विठ्ठलराव दराडे, अण्णासाहेब डवले, सचिन डवले, दत्ताराव पितळे, डिगांबर भले, सर्जेराव, आप्पा घनवट, हनुमान पिसाळे, लक्ष्मण पिसाळ, आदींची उपस्थिती यावेळी होती..

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत