सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पोलीस स्टेशन आष्टी येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न...


====================
परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक आष्टी पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कोरणा संदर्भामध्ये शिवजयंतीच्या उत्सव साजरा करण्यासाठी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यामध्ये शिवभक्त शिवज्योत घेऊन जाण्यासाठी 200 लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे तसेच पाचशे लोकांनी एकत्र येऊन शिवजयंतीचा उत्सव साजरा करावा असे दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे याच अनुषंगाने आष्टी पोलीस स्टेशन येथे समता, बंधुता, न्याय, या मूलभूत हक्क याची अंमलबजावणी आपण केली पाहिजे आणि शांततेत शिवजयंती उत्सव आपण साजरी करावा .असे आष्टी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागवें साहेब यांनी शांतता बैठकीमध्ये सांगितले .या शांतता बैठकीला उपस्थित म्हणून पंचायत समिती परतूर चे उपसभापती रामप्रसाद थोरात , जागीरदार, सिद्धेश्वर सोळंके, मधुकर बाप्पा खरात, आष्टी ग्रामपंचायत सदस्य, व पत्रकार बंधु, उत्सव समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत