सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा पोलीस ठाणे येथे विद्यार्थ्यांने जाणून घेतले पोलीस कामकाज



 मंठा प्रतिनिधी /सुभाष वायळ
       दि.21 तालुक्यातील पांगरी गोसावी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच मंठा पोलीस स्टेशनला भेट दिली.यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलतांना पो.नि.देशमुख यांनी केले.या भेटीत विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनचे कामकाज कशाप्रकारे चालते याविषयीची माहिती घेतली. यावेळी पोलिस निरीक्षक संजय देशमुख,पत्रकार संरक्षण समिती तालुकाध्यक्ष रणजित बोराडे,मुख्याध्यापक के.के. भांडवलकर,फौजदार बलभीम राऊत,आसमान शिंदे यांची उपस्थिती होती.
     या अभिनव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी गुन्हा कसा दाखल होतो, ठाणे अंमलदाराचे कार्य, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग कसा केला जातो, समाजामध्ये शांतता आणि सलोखा राखण्यासाठी पोलीस कशाप्रकारे काम करतात आदीबाबत सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक यांनी विद्यार्थ्यांना दिली.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कशा पद्धतीने करावा याविषयी देखील माहिती दिली.मोबाईल वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी देखील सांगितले. महिला पोलीस कर्मचारी सविता फुलमाळी यांनी मुलींना न घाबरता अन्याय विरोधात तक्रार देण्यासाठी त्यांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन केले.यावेळी शंकर राजाळे,दीपक आढे,प्रशांत काळे,विजय तांगडे, विशाल खेडकर,संतोष बनकर,गायके,आनंद ढवळे,दिपक ढवळे, संदीप राठोड, पांडुरंग हागवणे,कानबाराव हराळ, मांगीलाल राठोड,शिक्षिका एस.एस.पोले,शिक्षक आर.डी.सुरनार यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
Show quoted text

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत