सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर येथील पारधी वाडा इंद्रा गिरी महादेव मंदिर येथील अतिक्रमण हटवण्यात यावे उपविभागीय अधिकारी परतूर यांना निवेदन सादर..


परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे
इंद्रा गिरी महादेव मंदिर येथे कडब्याची पेंडी व कुपाटी टाकून अतिक्रमण करण्यात आले आहे. शेत गट नंबर 272 /2 मधील निजाम कालीन महादेव मंदिर असून सन 1981 पासून सदर मंदिर देवस्थानचे रामा मालू काळे हे अर्थक सेवक असून मंदिराची देखभाल व दुरुस्ती करतात व पूजाअर्चा करत आहेत. मंदिराच्या प्रवेश शंभर फूट जागा दक्षिणेस 20फूट जागा व उत्तरेस 20 फूट जागा अशी आहे सध्या सदर ठिकाणी विद्युत पुरवठा नाही तसेच सदर मंदिर परतूर शहरातील पुरातन मंदिर असून अनेक वर्षी श्रावण महिन्यात प्रत्येक सणाला लोकांची जास्त प्रमाणात गर्दी होत असे सदर ठिकाणी इंगळा गिरी महादेव मंदिराचे समोर काही व्यक्तीनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सदरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे जेणेकरून सदर मंदिरासमोर दरवर्षी होणारी यात्रा करणे सुलभ होईल अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर यांना रामा मालू काळे यांनी दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत