सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरणासाठी १६० लसीकरण केंद्र


मंठा प्रतिनिधी /सुभाष वायाळ
            दि.२५ मंठा तालुक्यात दिनांक २७ फेब्रुवारी रविवार रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. यासाठी तालुक्यामध्ये १६० लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आली या ठिकाणी तालुक्यातील १८ हजार ९३० या पाच वर्षाच्या आतील सर्व बालकांना मोफत पोलिओ डोस दिला जाईल. असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मुकेश मोटे यांनी सांगितले आहे. 
      पल्स पोलिओ लसीकरणासाठी तालुक्यात एकूण १६० लसीकरण बुथ उभारण्यात आले आहेत. सर्व लाभार्थी ना लस मिळावी यासाठी एसटी स्टँड,बांधकामाची ठिकाणी, रस्त्यांची कामे,ऊसतोड कामगार,वीटभट्ट्या,वाड्या इत्यादी ठिकाणाच्या लसीकरणासाठी ०७ मोबाईल पथक,०७ ट्राजिस्ट टीम स्थापन करण्यात आल्या आहेत. असे तालुका नर्सिंग ऑफिसर अर्जुन हमिर्गे यांनी सांगितले. 
या लसीकरणासाठी आरोग्य विभागाकडून ०६ वैद्यकीय अधिकारी,३३ सुपरवायझर ४३६ आरोग्य कर्मचारी,एन.एम.एम,एम.पी.डब्ल्यू, अंगणवाडी,गटप्रवर्तक,अशा इत्यादी स्वयसेवक परिश्रम घेणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत