सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा पोलीस ठाणे येथे शिवजयंती निमित्त शांतता समिती बैठक संपन्न शिवजयंती शांततेत साजरी करा -पो.नि.संजय देशमुख


मंठा(सुभाष वायाळ )दि.१७ मंठा पोलीस ठाणे येथे शिवजयंती निमित्त शांतता समिती बैठकीचे आयोजन दि.१७ गुरुवार रोजी करण्यात आले होते.यावेळी पोलिस निरीक्षक संजय देशमुख पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष रंजीत बोराडे , पोहेका.शंकर राजाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयोजित बैठकीत पो.नि.देशमुख यांनी सांगितले की, शिवजयंती शांततेत व शासन परिपत्रकाच्या नियमानुसार तसेच कोरोनाच्या नियमाचे काटेकोर पालन करून साजरी करावी असे आव्हान केले. याप्रसंगी डिगांबर बोराडे, शिवजयंती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप बोराडे , सचिन चव्हाळ , महेश बोराडे ,शुभम बोराडे , विजय बोराडे , विकास बोराडे , किरण सूर्यवंशी , कृष्णा खरात , शिवराज बोराडे , दत्ता घुगे यांच्यासह पत्रकार सुभाष वायाळ , अशफाक शेख , बाळासाहेब खराबे यांची उपस्थिती होती.सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतिने आयोजित कार्यक्रमांची रूपरेषा सांगण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत