सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

विलास आकात यांच्याकडून सुमेध घनघावला उपचारासाठी आर्थिक मदत

 
  परतूर – प्रतिनिधी हनुमंत दवंडे
  येथील सुमेध राजु घनघाव रा. परतूर (वय १९) याला आठ महिन्यापूर्वी अपघातात डोक्याला मार लागल्याने जखमी झाला होता. त्याचा उपचारासाठी सातोना     येथील भाजपाचे विलास आकात यांनी दहा हजार रुपये आर्थिक मदत केली आहे.    
  सुमेध घनघाव हा नातेवाईक सोबत परतुर ते आष्टी रोडवर एचपी पेट्रोलपंपच्या समोर पुलाजवळ गाडी खड्ड्यात जावुन गाडीवरील ताबा सुटल्याने दि. २६ जून २०२१ रोजी अपघात झाला होता. या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने सुमेध हा बेशुद्ध झाला. दवाखान्याला मोठा खर्च लागल्याने घरची शेती, ट्रॅक्टर, प्लॉट विकून, नातेवाइकाकडून पैसे आणून दवाखाना खर्च केला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिति बिकट असल्याने समाजातून आर्थिक मिळाली. सध्या त्याच्यावर औषध उपचार चालु आहे. जवळ असलेली आर्थिक पुंजी संपली असल्याने कुटुंबासमोर आर्थिक अडचणीचा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या औषध उपचाराचा खर्च मोठा असल्याने आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत