सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

ऑस्ट्रेलियातुन सेवा पूर्ण करून आलेल्या अभियंत्यांचा परिवारा कडून सत्कार


परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
ऑस्ट्रेलिया येथे सहा वर्ष संगणक अभियंता म्हणून काम करत परतूर येथील सुपुत्र भारतात परतल्यावर त्यांचा कुटूंबाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
    परतूर येथील भगीरथ भारतराव केशरखाने ये ऑस्ट्रेलिया येथील सिडनी शहरात इन्फोसिस कंपनीत संगणक अभियंता म्हणून मागील सहावर्ष पासून काम करत होते. दि 19 रोजी सहा वर्षे पूर्ण करून सपत्नीक ते भारतात परतले या बद्दल बरीदे परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. भगीरथ यांनी अंबाजोगाई येथून आपले अभियंता चे शिक्षण पूर्ण केले आहे. परतूर येथील बरीदे परिवाराचे ते भाचे आहेत. परतूर येथे पोहचल्यानंतर गटविकास अधिकारी नारायण बरीदे व पत्नी प्रभावती बरीदे यांनी त्यांचा सत्कार केला या वेळी सहाशिक्षक रमेश बरीदे, सोनुभाऊ बरीदे,पांडुरंग कानपुडे,बाळू धारूकर, लक्ष्मीकांत माने,नागेश केशरखाने , श्रीमती शोभा बरीदे,सकाळ चे तालुका बातमीदार योगेश बरीदे आदी उपस्थित होते.

..

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत