सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा तालुक्यातील बहुतांशी अधिकारी-कर्मचारी यांना मुख्यालय राहण्याची ॲलर्जी



 मंठा-/प्रतिनिधी पप्पू घनवट
      दि.9 मंठा शहरासह  भागात कार्यरत असणारे अधिकारी-कर्मचारी हे मुख्यालय राहताना दिसून येत नाहीत. यामुळे स्थानिक नागरिकांना  अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शासन निर्णयाप्रमाणे सर्वांना मुख्यालयी राहणे अनिवार्य आहे. तरीपण ही मुजोर अधिकारी-कर्मचारी  या नियमाला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. यामधील काही कर्मचारी आहे हे जालना,परभणी, नांदेड,औरंगाबाद,परतुर, लोणार,जिंतूर, सेलू, या ठिकाणाहून ये-जा करत असतात. त्यांच्या या येणे-जाणे करण्याच्या कारणामुळे हे कार्यालयीन वेळेवर हजर होत नाही. बाहेरगावी जाण्याचे असल्या कारणामुळे तर कार्यालयीन वेळेच्या अगोदर निघून जातात. यांच्या या असल्या वेळेमुळे लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. तसेच बऱ्याच कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी हे हॉटेलमध्ये शोधावे लागतात. काही अधिकाऱ्यांनी तर कमालच केली आहे.चक्क स्वतःचे काम करण्यासाठी रोजंदारीवर ठराविक रक्कम देऊन माणसे ठेवलेली आहेत.तसेच खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांना अधिकरी कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तरी संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्या मुजोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकातून होत आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत