सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

असंघटीत कामगार आणि महिलांच्या लसीकरणासाठी “मिशन कोरोना विजय”

परतूर (हनुमान दवंडे )
  असंघटीत कामगार आणि महिलांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी  सीएससी अकॅडमी, अमेरिकन इंडियन फौंडेशण  आणि युवा जागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “मिशन कोरोना विजय” प्रकल्प राबवण्यात येत आहे.  लसीकरणाबाबत गैरसमज दूर करून  असंघटीत कामगार, अपंग व्यक्ती, महिला, स्थलांतर होणारे कुटुंब यांचे लसीकरण  पूर्ण करून घेणे हा या प्रकल्पाचे मुख्य उददेश आहे.  या प्रकल्पा अंतर्गत  जिल्ह्यातील गावा –गावात जाऊन  स्थलांतरीत होणारी कुटुंब, अपंग व्यक्ती आणि काळजीवाहक, किशोरवयीन मुलं यांच्यामध्ये लसीकरणा बाबत जनजागृती निर्माण करण्यात आली. त्यांच्यासाठी त्यांना जवळ आणि सोयीच्या ठिकाणी  लसीकरण शिबिराचे  आयोजन देखील करण्यात आले. गावातील सरपंच, आशा सेविका,अंगणवाडी सेविका आणि युवा स्वयंसेवक यांच्या सहायाने आता पर्यत जिल्ह्यातील 642 गावातील सुमारे चाळीस हजार व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी मदत आणि सहकार्य करण्यात आले असल्याचे जिल्हा समन्वयक श्री  डॅनियल सुतार यांनी सांगितले. आगामी काळात  ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्रत्येक महिलाचे  लसीकरण पूर्ण करन्यावर भर देण्यात येणार असल्याचे श्री सचिन अंभुरे यांनी प्रतिपादन केले या कामासाठी तांत्रिक आणि व्यवस्थापकिय सहाय सीएससीचे राज्य समन्वयक श्री. समीर पाटील, प्रकल्प समन्वयक श्री. सुयोग दीक्षित आणि वैभव देशपांडे हे करत आहेत. 12 लाख असंघटीत कामगारांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष निर्धारित केले होते आता पर्यत संपूर्ण भारतात या प्रकल्पा अंतर्गत 1,064,523 लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असल्याचे युवा जागृती संस्थेचे सचिव श्री. गोकुळ चंद सैनी यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत