सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

सचिन मगर यांचा पी.एचडी.पदवी प्राप्त केल्या बद्दल सत्कार


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सचिन किसनराव मगर यांनी नुकतिच गणित या विषयात पीच.डी.(Ph.D.) ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी संपादन केली.
     सचिन मगर यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गणित विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डाॅ. कीर्तीवंत घडले यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन कार्य केले. " सम काॅन्ट्रीब्युशन टू फ्रॅक्शनल डिफ्रनशियल इक्वेशन्स युजिंग इंटिग्रल ट्रान्सफाॅर्न्स " असा विषय आहे. 
सचिन मगर हे लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे सेवा निवृत्त कार्यालयीन अधिक्षक किसनराव मगर यांचे चिरंजीव आहेत.
     सचिनच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.परतूर येथील पतंजली आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिकचे डाॅ.दीपक दिरंगे यांनी त्याचा यथोचित सन्मान केला. या प्रसंगी माजी प्राचार्य डॉ.भगवान दिरंगे आणि मित्र मंडळी उपस्थित होती.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत