सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

वन्य प्राणी व मोकाट जनावरांनी दोन हेक्टर क्षेत्रावर पेरलेला हरबरा खाऊन केला फस्त..,शेतकऱ्याचे दिड ते दोन लाखांचे नुकसान...


मंठा प्रतिनिधी रवी पाटील 
मंठा तालुक्यातील तळणी येथील शेतकरी कैलास रामराव सरकटे यांची साडेतीन एकर 
 व विष्णु रंगराव सरकटे यांची अडीच एकर जमीन आहे.
 कालच्या रात्री दि.2 मार्च रोजी नेमका काढणीला आलेला हरबरा या वन्य प्राण्यांनी खाऊन फस्त केल्याने रात्रंदिवस मशागत व खत पाणी घालुन जोरदार पिकविलेला हाता- तोंडाशी आलेला हरबरा फस्त झाल्याने शेतकरी कासाविस होऊन या शेतकऱ्याचे जवळपास दिड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
तरी तालुक्यातील वन विभाग,महसुल विभाग तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे...
तळणी परीसातील विदर्भाच्या सिमेलगत मोठे वनिकरण असुन या व निकरणातील झाडी मध्ये रान गाई रोही रानडूक्कर निलगाई माकड यांचा व अन्यप्राण्याच्या ञासा सोबतच गावातील शंभर मोकाट जनावरांचा ञास गावखोरच्या शेतकर्याना होत असुन याचा बदोबंस्त होणे गरजेचे असलेच्या प्रतिक्रीया अनेक शेतकर्यानी व्यक्त केल्या
पोर्टल बंदच संबंधीत शेतकर्यानी नुकसानीची तक्रार म्हणून वन विभागाच्या अधिकार्याकडे तक्रार केली असता त्याना ऑनलाईन तक्रार करण्याची माहीती वन विभागाच्या अधिकार्याकडून दीली गेली पंरतू . ते पोर्टलच बंद असल्याने तक्रार करावी कोणाकडे असा प्रश्न शेतकर्याना पडला आहे 
सपूर्ण मंठा तालूक्यातून बऱ्याच शेतकर्याच्या तक्रारी आहेत शेती मालाचा वान बघून त्याची नुकसान भरपाई दीले जाते शासन निर्णयानुसार कितीही नुकसान झाले तरी एक हजाराच्या वर नुकसान भरपाई देता येत नसल्याचे ता वन विभाग अधिकारी ऐ पी अटकल यांनी सांगीतले तसेच ऑनलाईन तक्रारीस काही अडचण असल्यास ऑफीस मध्ये येऊन तक्रार नोदवली जाईल

एकीकडे अतीवृष्टी तर कधी दुष्काळी, अस्मानी व सुलतानी संकट तसेच
विजेची हुलकावणी व घर सोडून रात्रंदिवस वन्य प्राण्यांचा सांभाळ करूनही हाता तोंडातशी आलेला घास हिरावल्याने शेतकर्याचे आर्थीक नुकसान होत असून अशा संकटामुळे 
शेतकरी हतबल होत असुन वन विभाग याकडे सात्यत्याने दुर्लक्ष करीत आहे शेत पीकांचे नुकसान झाल्यावर ना कृषी अधिकारी याकडे लक्ष देतात ना वन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.*
*केवळ तालुक्याच्या ठिकाणावरून वनविभागाचे कर्मचारी कित्येक वेळा नुकसान झाल्याच्या तक्रारी करून सुध्दा ना पंचनामा होतो ना शेतकर्याना ना मदत मिळते वनविभागाचे अधिकारी तालूक्याच्या ठिकाणावरून कारभार सांभाळत असल्याचे मत शेतकरी कैलास सरकटे यानी व्यक्त केले ..*

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत