सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शिवरायांनी ३५ वर्षात साडे सातशे वर्षाचं पारतंत्र्य संपवलं –प्रा.नितीन बानगुडे पाटील,परतूर तालुका शिवसेनेच्या वतीने शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन




परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
        ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी यशाचा मूलमंत्र आपल्या कार्यकर्तृत्वातून आपल्यासमोर ठेवला आहे. जगात स्वतःला आर्थिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज्याच्या व्यवस्थापनाचे धडे आजही शिकविले जात आहे. माणसाला हवं तिथं पोहचता येत, मात्र यासाठी केवळ विचार करून चालत नाही तर प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करणे गरजेचे असल्याचे मत सुप्रसिद्ध व्यख्याते तथा शिवसेनेचे उपनेते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब तेलगड यांच्या पुढाकारातून शक्रवारी सायंकाळी ७ वाजता शहरातील वरद विनायक लोन्स येथे आयोजित व्याखानात ते बोलत होते. यावेळी परभणी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार संजय जाधव, जालना जिल्हा प्रमुख ए.जे.पाटील बोराडे,युवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, जिल्हा संघटक मोहनकुमार अग्रवाल, रामेश्वर नळगे, तालुकाप्रमुख अशोकराव आघाव,सुदर्शन सोळंके, शहर विदुर जईद आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

          याच कार्यक्रमात समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.नेत्रसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असणारे लायन्स क्लबचे मनोहर खालापुरे, कारगिल युद्धात देशाच्या सीमेवर कामगिरी बजावणारे भारतीय सैन्यातील जवान तुकाराम उबाळे, वारकरी संप्रदायात तालुक्याचे नाव राज्यपातळीवर गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रूपालीताई सवने परतूरकर, सेवासाधना गुरुकुलचे प्रदीप कातारे, उपक्रमशील शिक्षक पिंटू मैसनवाड, संत नामदेवांच्या साहित्यावर संशोधन करणारे शेषराव वायाळ, कविता गायनासाठी प्रसिद्ध खांडवी येथील श्रावणी बरकुले यांचा समावेश आहे.

      या कार्यक्रमाला परतूर शहर आणि परीसरातील नागरिकांसह महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिका-यांनी परिश्रम घेतले

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत