सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते बाबासाहेब पाटील खरात काळाच्या पडद्याआड.

परतूर प्रतिनिधी /हनुमंत दवंडे 
जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील श्रीधर जवळा येथील बाबासाहेब पाटील खरात हे गेल्या बेचाळीस वर्षा पासून शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. खा शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील काम करत होते.
          त्यांनी 1980 ला शेतकरी संघटनेचे बळीराज्य गाव आसी पहीली शाखा खोली व जिल्ह्याबर आजपर्यंत एकनिष्ठ शेतकरी संघटनेचे काम केले ते अनेक आंदोलनात हिरीरीने भाग घेवून आंदोलन यशस्वी करायचे आज दि01/03/2022ला सकाळी 8:३0 मिनिटानी औरंगाबाद येथे प्राणज्योत मावळली..... त्याचां अंत्यविधी टिक 4.00 वाजता झाला त्यांचे अत्यंंविधीला जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे संपूर्ण कार्यकर्ते सहीत नातेवाईक मंडळी व संपूर्ण गावकरी मंडळी व महिला मंडळ उपस्थित होते या मध्ये बाबासाहेब पाटील यानांना भावपूर्ण श्रद्धांजली देताना गजानन पाटील भांडवले यानी त्यंच्या कार्य आठवणी सांगितल्या व शिवाजी महाराज भोसले व लक्ष्मणराव वडले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली दिली व त्यानंतर पसायदान घेतले व नंतर शेतकरी संघटनेचे नेते बाबुरावजी गोल्डे यानी बाबासाहेब पाटील गेल्या नंतर शेतकरी संघटनेचा झेंडा त्यांचे चिरंजीव ईंदरराव बाबासाहेब पाटील खरात यांच्या स्वादिन केला व बाबासाहेब पाटील यांच राहिलेल् काम त्याचां मुलगा ईंदरराव यांने स्वीकारल.... या अन्तेविधीसाटी गजानन पाटील राजबिंडे तुकारामभाऊ गवळी सुरेश भाऊ गवळी संताराम राजबिंडे डॉ ऊतम काळे सदाभाऊ खलशे पुजाराम तात्या सुरुग रंगनाथ शिंदे व इतर सर्व पक्षी मंडळी उपस्थित होते विशेष म्हणजे बाबासाहेब पाटील याना निरोप देताना... गावातील भजनी मंडळीने वाजत गाजत निरोप दिला

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत