सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

कर्जबाजारी युवक शेतकऱ्यांची गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा


परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे

परतूर येथील युवक शेतकरी दिनकर हरिभाऊ मुजमुले वय 35 वर्षे याने गुरुवार ता.14 रोजी रात्री 7: 30 च्या सुमारास स्वतःच्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे 
घटनेची माहिती मिळताच घटस्थापस्थळी पोलीस शिपाई श्री. अशोक गाढवे,श्यामुअल गायकवाड, श्री कोकाटे यांनी भेट देत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले .उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईक स्वाधीन करण्यात आला.
सतत शेतीपिकाचे होणारे नुकसान,नापिकता यामुळे हे पाऊल उचले असल्याचे बोलले जात आहे
        भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पाच लाखाच्या वर कर्ज असल्याचे समजते याचबरोबर काही खाजगी सावकाराचे पण कर्ज होते. खाजगी सावकाराने तगादा लावल्याने हे पाऊल त्यांनी उचले आसाअंदाज व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी, पत्नी आई असं  परिवार आहे.
घटनेची नोंद पोलीस ठाण्यात देण्यात आली असून घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार हे करीत असल्याची माहिती श्री अशोक गाढवे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत