सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

सुमित भंडारी व संतोष काळे यांच्या वतीने इफ्तार पार्टी संपन्न


परतूर/प्रतिनिधी हनुमंत दंवडे

पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुमित भंडारी व संतोष काळे,सय्यद तय्यब यांच्याकडून उपवास धारकांना इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
मोंढा भागातील तय्यब मोबाईल शॉपच्या आवारात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते 
यावेळी शहरातील उपवास धारक, व्यापारी वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती 
यावेळी सुमित भंडारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की देशामध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी हिंदू-मुस्लिम समाजाने एकोपा जपला पाहिजे आणि सर्वधर्मीय सण उत्सव मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन साजरे केले पाहिजे
यावेळी माजी नगरसेवक आबासाहेब कदम,शिवसेना शहराध्यक्ष दत्ता सुरुंग,राहुल कदम,सचिन खैरे,अंकुश काष्टे,पांडुरंग सोळंके,अविनाश कुलकर्णी, मदन सोळंके,हबीब शेख,जुबेर खतीब,राजेश गोरे,राहुल काळे,शत्रूधन सोळंके,सुरेश नवगिरे,नसीर शेख,शेख अकबर,शेख अथर,सचिन धुमाळ,भारत धुमाळ,यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत