सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शेतकऱ्यांच्या गुणवंत मुलींचा सत्कार संम्पन

परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
बळीराजा करिअर अकॅडमी,खरपुडी जि. जालना या संस्थेच्या वतीने ई. 11 व 12 वी च्या विद्यार्थ्यांना मोफत निवासी कोचिंग क्लास घेण्यात येणार आहेत. यामध्ये NEET, JEE, MHCET या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी या संस्थेने जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेतली होती. 
           या कठीण असलेल्या परीक्षेत आनंद माध्यमिक विद्यालय परतूर च्या विद्यार्थिनी झाशी राजेभाऊ जगताप , श्रावणी राजकुमार तांगडे , पूजा भारत मंडपे या उत्तीर्ण झाल्या. त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक प्रशांत वेडेकर , अनुसया गारकर , विक्रम भांडवलकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थान राजकुमार तांगडे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेभाऊ जगताप , एकनाथ कदम उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात राजकुमार तांगडे म्हणाले की, मुलीच्या यशस्वीते बद्दल आई-वडिलांचा सत्कार होणे याचे मोल होऊ शकत नाही.या यशाचे श्रेय शिक्षक व मुलींचे आहे. यामुळे शाळेच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संजय कदम यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत