सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

महावितरणच्या नाकावर टिच्चुन खाजगी एजन्सीकडुन बोगस आयटीआयधारकांना नियुक्त्यामहावितरण उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर




परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
   परतुर शहरातील महावितरण विभागामार्फत नेमून दिलेले खाजगी एजन्सीने बाह्यस्त्रोत यंत्रचालक व बायस्रोत जनमित्र यांची एजन्सीने मनमानी पद्धतीने आयटीआयचे खोटे बनावट प्रमाणपत्र आणून आर्थिक देवाण-घेवाणीतुन नियुक्त्या देऊन नोकऱ्या करीत आहेत. दरम्यान नियमित शासकीय आयटीआय पास बेरोजगार विद्यार्थी यांना डावलण्यात आले आहे.
      आम्ही नियमित दोन वर्षे पूर्ण अभ्यास करून आमचे शिक्षण पूर्ण केले असुन या नियुक्ती दरम्यान आमचा कसलाही विचार केला नसल्याचा आरोप महावितरण विभागाला दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. आम्ही आपल्या मंडळ कार्यालयामध्ये कोणी बाह्यस्रोत यंत्रचालक म्हणून तर कोणी लाईनमन म्हणून काम केलेले आहे. आमचा त्या संबंधित कामाचा अनुभव आहे. तरी आम्हाला वरील पदासाठी डावलून आर्थिक देवाण-घेवाण करून आयटीआयचे खोटी प्रमाणपत्र घेऊन नियुक्त्या दिल्या आहेत. आपण नेमून दिलेल्या एजन्सीने शासकीय आयटीआय केलेल्या विद्यार्थ्यावर अन्याय केला आहे. येणाऱ्या ई टेंडर मधील एजन्सीला नियमित आयटीआय शासकीय आर्हता धारक लोकांना घेण्यात यावे. आमच्या वरील अन्याय दूर करावा. वरील आयटीआय खोटी प्रमाणपत्रची आणि कागदपत्रे पडताळणी करण्यात यावी. व त्यांना कामावरून कमी करण्यात यावे. जेव्हा टेंडर होईल त्या वेळी संबंधित एजन्सीला शासकीय नियमात आयटीआय आर्हता उमेदवारांना नियुक्त्या देण्यात याव्यात, असे आदेशीत करावे. आमच्या वरील अन्याय दूर करावा. नसता येणाऱ्या काळात आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आम्ही उपोषण आंदोलन करू,असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर शेख उस्मान, देविदास खालापूरे, विशाल एकेवार, दिपक मोरे, रमेश चव्हाण, अतिष सवणे, विशाल चव्हाण, सचिन सरकटे, दिपक शिलवंत, दिपक राऊत सह आदी विद्यार्थ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत