सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

जोगेश्वरी भैरवनाथ यात्रेनिमित्त पाणपोईचे उद्घाटन..


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
घनसांवगी तालुक्यातील पारडगाव येथील रविवार रोजी जोगेश्वरी भैरवनाथ च्या यात्रा निमित्त.
सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश भैय्या टोपे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील.कै. सेनाजी शामराव भालेकर यांच्या समानार्थ. पाणपोईचे उद्घाटन धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष शिवाजी वालेकर यांनी यात्रेसाठी येणाऱ्या भक्तांसाठी तसेच बजाराला येणाऱ्या नागरिकासाठी थंड पाण्याची व्यवस्था केली आहे.अंकुश उद्घाटन राजनी चे सरपंच अमोल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष शिवाजी भालेकर. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रकाश कोकणे. राष्ट्रवादीचे माजी सरपंच सुभाष झोरे. दिगंबर ढेरे. प्रभाकर ढेरे. उद्धव माकोडे. दिपक खरात. ज्ञानराज भालेकर. यांची उपस्थिती होती
बाजारात येणाऱ्या नागरिकांनी थंड पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे समाधान व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत