सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा येथे छत्रपती शंभूराजे जन्मोउत्सव निमित्त व्याख्यान संपन्न

मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
दि.१७ मंठा येथे जिल्हा परिषद प्रशाला प्रांगणात छत्रपती शंभूराजे जन्मोउत्सव निमित्त संभाजी ब्रिगेड मंठा तर्फे शिवश्री प्रा.गंगाधर बनबरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ज्ञानेश्वर वायाळ यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुणे प्रा.गंगाधर बनबरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक शिवश्री संजय देशमुख यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.व कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवश्री सोमेश घारे यांनी केले. शिवश्री सुदर्शन तारक, यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. तर शिवश्री प्राध्यापक गंगाधर बनबरे यांनी प्रत्यक्षात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना श्रोत्यांच्या अंगावर शहारे येतील असे प्रसंग संभाजी महाराजांच्या जीवनातील सांगितले.व आयुष्यात एकही लढाई न हरणारे राजे तसेच आजच्या तरुण पिढीने त्यांचा आदर्श घेऊन जीवन जगावे. आजच्या घडीला काही पक्ष व संघटना देशामध्ये अस्थिरता निर्माण करत आहेत. परंतु आजची जी शांतता प्रस्थापित झालेली आहे.ती शांतता दिसण्याचे एकमेव कारण म्हणजे संभाजी ब्रिगेड ने केलेले समाज प्रबोधन यामुळे याचे सर्व श्रेय संभाजी ब्रिगेडला जाते.संभाजी ब्रिगेड महिला ता.अध्यक्ष सौ.देशमुख उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाला छत्रपती शंभूराजे प्रेमी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, सर्व मराठा संघटनेचे पदाधिकारी, व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.संतोष मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड च्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत