सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा येथे होणाऱ्या अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनाच्या निमंत्रक पदी ए.जे. पाटील बोराडे


मंठा प्रतीनिधी सुभाष वायाळ
      अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दिनांक 28 व 29 मे रोजी अखिल भारतीय मराठी नवोदित साहित्य संमेलन जालना जिल्हयातील मंठा शहरातील गणेश मंगल कार्यालय लॉन उस्वद रोड मंठा येथे होणार आहे. या संमेलनाच्या निमंत्रक पदी ऐ. जे.पाटील बोराडे यांची निवड करण्यात आली. या निवडी नंतर मंठा येथील शासकीय विश्राम गृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोराडे यांनी संमेलनात जास्तीत जास्त लोकांनी या संमेलनात सहभाग नोंदवावा असे आव्हान श्री बोराडे यांनी केले आहे, 

  अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने 1993 पासून आज पर्यंत वेगवेगळी 116 संमेलन घेतली आहेत. यामध्ये अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. मंठा येथे 28 व 29 मे2022 रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे तर स्वागताध्यक्ष इंजि.विजय घोगरे भूषिवणार आहेत, 
29 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आहे. या संमेलनात राज्यभरातून जवळपास 400 साहित्यिकांनी संमेलनात आपली नोंदणी केली आहे. हे संमेलन मंठा सारख्या ग्रामीण भागात होत असल्यामुळे हि मंठा शहरासाठी भूषणीय आणी अभिमानाची बाब आहे. तरी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार होण्यासाठी आपण सर्वांनी या दोन दिवस आपला सहभाग नोंदवावा, विविध कला पथक व लोककलारांनी भजनी मंडळ यांनी ग्रंथदिंडी मध्ये आपला सहभाग नोंदवावा अधिक माहिती साठी 9803980999/ 9423156173 या नंबर वर संपर्क साधावा,
  या वेळी पत्रकार परिषदेला महाराष्ट्र कार्याध्यक्ष अनिल खंदारे, प्रा. प्रदीप देशमुख, प्रा. डॉ. सदाशिव कमळकर, तुळशीराम कुहिरे, श्रीरंग खरात, सतिष खरात, के.जि. राठोड, गौतम वाव्हल, भारत केंधळे यांच्या सह आदी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत