सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतुर ते चौंडी विशेष बस सेवेसाठी परतूर आगार प्रमुख यांना निवेदन...



परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दंवडे
31 मे रोजी चौंडी येथे होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवासाठी परतुर आगारातून विशेष बस सेवा सोडण्याची मागणी आगार प्रमुख यांना मौर्य क्रांती संघ परतूर यांच्या नेतृत्वा खाली एका निवेदनाद्वारे सोमवारी करण्यात आली
       31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे भव्यदिव्य जन्मोत्सव साजरा केला जातो .या निमित्ताने चौंडी येथे देशभरातून हजारो भाविक भक्त अहिल्या प्रेमी जमा होतात ,परतूर तालुक्यातील चौंडी येथे जाणाऱ्या भाविक भक्त व अहिल्याप्रेमीची संख्या मोठी आहे. परतूर तालुक्यातील हजारो लोक अहिल्यादेवी यांना अभिवादन करण्यासाठी चौंडी येथे जाणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी परतुर आगारातून म्हणजे परतुर, आष्टी, लोणी ,माजलगाव या ठिकाणावरून बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली माननीय जिल्हाधिकारी आणि परिवहन मंत्री यांना या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या . निवेदना वरील सह्या हनुमंत दवंडे ,दत्ता कोल्हे, विलास रोकडे ,भागवत रोकडे, विलास तरव टे, नामदेव गोरे, शिवाजी भालेकर ,बाबू गोसावी, शिवाजी तरवटे ,माऊली बोराटे, प्रमोद पिसाळ, कृष्णा गायकवाड, दादाराव बकाल , विलास रोकडे,राम दुगाने, कृष्णा गायकवाड, यावेळी आदींची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत