सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा येथील कन्या शाळेत वाटप न झालेल्या शालेय पोषण आहाराची चौकशी करा...गट शिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पालकांची मागणी



मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
 दि.22 शहरातील कें. प्रा.कन्या शाळेत मागील वर्षी म्हणजेच वर्षा आखेरीस शालेय पोषण आहार शासनाकडुन पाठवण्यात आलं होत.कोरोणाच्या काळापासुन शाळेत खीचडी न करता कोणतेही अन्न न शिजवता ते तसेच विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे.
       पण मंठा येथील कन्या शाळेत मागील वर्षी शाळेत आलेल शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल नाही. काही पालकांनी शाळेत जावुन शालेय पोषण आहाराची मागणी ही केली कारण ईतर शाळांनी आलेल धान्य त्याच वेळेत विद्यार्थ्यांना वाटप केल पण कन्या शाळेत धान्याची वाटप का?करत नाहीत असे पालकांनी विचारल पण कन्या शाळेतील प्राध्यापक ए टी चव्हाण यांनी कोणाचाही ऐकल नाही आणी वर्ष आखेरीस आलेल शालेय पोषण आहार वाटप केल नाही आणी आता जे विद्यार्थी शाळेतुन टी सी घेवुन बाहेर गावी जात आहेत ते का फक्त धान्यासाठिच शाळेत येवु शकत नाहीत मग ते त्या धान्यापासुन वंचीत राहत नाही का?आणी वर्ष आखेरीस आलेल शालेय पोषण आहार शाळेतच आहे म्हणता आहे की ते परस्पर काळ्याबाजारात विक्री केल गेल माहीत नाही कारण नविन वर्ष सुरू होताच पुन्हा शाळेला शालेय पोषण आहार उपलब्ध झाल मग कोणत वाटता हे कस कळणार कारण शाळा चालु होवुन आठवडा झाला पण आजुन एक ही दिवस शाळेत खीचडी शिजली नाही आणी ईतर शाळांनी शाळा सुरू होताच खीचडी शिजवण्यास सुरूवात केली.सांगायच म्हणजे मागच्या वर्षीच धान्य त्याच वर्षी वाटप करणे अनिवार्य असते मग ते धान्य का?वाटप करण्यात आले नाही याची सखोल चौकशी करण्याची मागणी पालकांनी गट शिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.गट शिक्षण अधिकारी हे दौऱ्यावर असल्याने गट समन्वयक के जी राठोड यांनी निवेदन स्वीकारल.


शाळा चालु झाल्यापासुन आजपर्यंत एक दिवशी शाळेत खीचडी शिजली नाही.मुलांना खावु दिले गेले नाही असे माझी मुल सांगत होती.पण ईतर शाळांनी शाळा सुरू होताच खीचडी शिजवण्यास सुरूवात केली:-सय्यद अल्ताफ पालक

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत